Friday, February 3, 2012

विपणन

प्रस्तावना
विज्ञानाच्या प्रगतीनुसार उत्पादन प्रक्रियेतही खूप काही बदल झाले. उत्पादित केलेली वस्तू उपभोग्य व्हावी यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले. उत्पादित केलेल्या वस्तुला स्थळ, वेळ व स्वरुप इ. उपयोगिता मिळावी म्हणुन मोठे प्रयत्न करण्यात आले. या सर्व प्रक्रियेस ’विपणन’ असे म्हणतात. विपणन हे एक प्रगत असे शास्त्र आहे. पूर्वीच्या काळी विपणन हे वाणिज्य व व्यापाराचा एक भाग समजला जात असे. पण आधुनिक काळात एक महत्त्वपुर्ण शास्त्र म्हणुन ओळखले जात आहे.

१.१ विपणन
इंग्रजीतील Marketing या शब्दासाठी मराठीत विपणन हा शब्द वापरला जातो. लॅटीन शब्द Mercatus पासुन फ्रेंचमध्ये Markeit, इटालियनमध्ये Merecato आणि जर्मनीत Market असे शब्द तयार झालेले दिसून येतात. वि हा धातू पणन या शब्दात जोडुन वि + पणन असा शब्द बनला आहे. पणन म्हणजे मालाची विक्री करणे होय. थोडक्यात, मालाची विक्री करण्याचे शास्त्र म्हणजे विपणन असा अर्थ होऊ शकतो
विपणन ही व्यापक संज्ञा आहे. बाजार (Market) आणि विपणन (Marketing) यातही फरक आहे.
व्याख्या
’विपणन’ या शब्दाच्या व्याख्या तज्ज्ञांनी विविध प्रकारे केलेल्या आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या व्याख्या पुढीलप्रमाणे
• "विपणन ही ग्राहकाच्या मागणीचा पाठपुरावा करणारी प्रक्रिया आहे. बाजारात वस्तुंना व सेवांना मागणी असते. तिच्या आधारे स्वःसाठी नफा आणि उपभोक्त्यांसाठी गरजांची पुर्तता विपणनातून साध्य होते."
- इ.एफ.एल.ब्रेच
• "विपणन ही प्रक्रिया आहे की ज्यामधून समाजाला अधिक उच्च प्रकाराचे राहणीमान उपलब्ध केले जाते."
-पॉल मसुर (Masur)
• "विपणन प्रक्रिया ही प्रत्येक व्यवसायाची सुरुवात आणि शेवट असतो."
-फिलिप कोटलर
• "वस्तू आणि सेवा यांचे एका व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे होणारे हस्तांतर, वस्तुंच्या मालकीचे हस्तांतर शक्य करणाऱ्या सर्व कृती म्हणजे विपणन होय."
अमेरिकन मार्केटींग असोसिएशन
मार्केटींग या संकल्पनेतून विविध कार्ये, एकत्रित स्वरुपाची सुचित केली जातात, ज्या कार्यांची दिशा मागणीला प्रोत्साहन देण्याची असते आणि निर्माण झालेली मागणी पुर्तता करण्याचा प्रयत्नही त्या प्रक्रियेत असतो.
१.१.१ विपणनाचे स्वरुप किंवा उत्क्रांती
विपणन हे प्रकाराचे सामाजिक आणि आर्थिक अशा स्वरुपाचे संधोनाचे क्षेत्र आहे. औद्योगिक क्षेत्रात, वाणिज्य क्षेत्रात जसेजसे वस्तू वितरणाच्या क्षेत्रातही हळूहळू बदल होत गेले आहेत, अशा बदलांना उत्क्रांती असे म्हणतात. उपभोक्ता आणि उत्पादक यांतील अंतर जसेजसे वाढत गेले, त्यांच्यातील प्रत्यक्ष संबंध संपून, परस्परसंबंध जसे दुरावले, तसतसे प्रमाणात विपणन प्रगत होत गेले. विपणनातील विविध प्रक्रियांची संख्या वाढत-वाढत गेली. भारतात विपणन क्षेत्रात जी उत्क्रांती होत गेली त्याच्या प्रमुख पायऱ्या (Stages) पुढीलप्रमाणे आहेत.
(१) स्वावलंबी अवस्था (Self Sufficient Stages): मानवी इतिहासात पुष्कळ वर्षे मानवाचे जीवन स्वावलंबी स्वरुपाचे होते. उत्पादक आणि उपभोक्ता या दोन्ही भूमिका एकाच व्यक्तीकडून बजावल्या जात असत. प्रत्येक कुटुंब आपापल्याला गरजा भागविण्याइतके स्वावलंबी होते. आपल्या गरजा भागतील एवढेच उत्पादन असल्याने विनिमयाचा प्रश्न नव्हता. विपणन ही संकल्पना त्या काळात माणसांच्या मनातही आली नाही. उत्पादन माफक प्रमाणावर असल्याने विक्री प्रयत्नांचा प्रश्नच अस्तित्वात नव्हता. यामुळे या अवस्थेला ’स्वावलंबी अवस्था’ असे संबोधले जाते.
(२) विनिमयाभिमुख अवस्था (Exchange oriented Stages): वाणिज्याच्या उत्क्रांती अवस्थेत ग्रामीण अर्थव्यवस्था हा दुसरा टप्पा होता. या अवस्थेत मानवी गरजा वाढत गेल्या, पण सर्व गरजा स्वबळावर भागविण्यासाची क्षमता कोणत्याही कुटुंबाची नव्हती. अशा परिस्थितीत दुसऱ्या कुटुंबाशी संपर्क साधण्याला चालना मिळाली आणि अल्प प्रमाणात एका वस्तुच्या बदल्यात दुसरी वस्तू असे व्यवहार सुरु झाले. मात्र अशा व्यव्हाराची संख्या स्थानिक पातळीवरच मर्यादित राहिली. कौटुंबिक पातळीवरील वस्तुंची आपापसातील अदलाबदल किंवा देवाण - घेवाण यामध्ये व्यक्ती परस्परांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असत आणि विनिमय माध्यमाशिवाय व्यवहार होत असत. विपणनाच्या उत्क्रांतीतील ही पहिली अवस्था समजता येईल.
(३) उत्पादनाभिमुख अवस्था (Product Oriented Stage): या अवस्थेमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रभाव आणि विविध क्षेत्रांतील शोधांचा प्रभाव उत्पादनावर पडलेला दिसतो. या काळात उत्पादकांनी आपल्या हितसंबंधांना प्राधान्य देण्यास सुरूवात केली आणि ग्राहकांवर आपला प्रभाव राखण्याचा प्रयत्न केला. यातून विपणन उत्पादनाभिमुखी बनले. ग्राहकांचा विचार, त्यांचे समाधान या गोष्टी कमी महत्त्वाच्या समजल्या गेल्या. वस्तुच्या सुधारणेकडे फक्त लक्ष दिले गेले आणि विक्रयवृध्दीसाठी खास वेगळ्या स्वरूपाचे असे प्रयत्न उत्पदकांनी केले नाहीत. थोडक्यात, उत्पादक जे बाजारपेठेत आणेल ते स्वीकारण्याची ग्राहकाची तयारी असे, पण ’ग्राहकांच्या कल्याणासाठी उत्पादन’ हा विचार त्या काळात दुर्लक्षित होता.
(४) विक्रीभिमुखी विपणन अवस्था (Sales Oriented Stage): केवळ उत्पादन नव्हे तर विक्रीकडेसुद्धा लक्ष पुरविण्याची गरज कालांतराने निर्माण झाली. याचे कारण बाजारपेठा आणि स्थानिक न राहता टप्प्याटप्प्याने त्यांचा शहरी बाजारपेठा असा होत गेला. वाहतुकीची नवनवीन साधने अस्तित्वात आली. विविध बाजारपेठांत विखुरलेल्या ग्राहकांशी नियमित संपर्क राखणे उत्पादकांना अवघड ठरू लागले आणि त्यामुळे विक्रीची पर्यायी व्यवस्था आवश्यक बनली. केवळ स्थानिक बाजारपेठांवर अवलंबून राहणे उत्पादकांना अयोग्य वाटू लागले आणि विक्रीचे प्रयत्न वाढविण्याची गरज स्पष्ट झाली. त्याचाच परिणाम म्हणजे मध्यस्थांची मदत घेणे गरजेचे वाटू लागले. उत्पादन पूर्वीप्रमाणे उत्पादकाभिमुख न राहता ते विक्रीभिमुख (Sales Oriented Stage) बनले. बाजारपेठेत काय विकले जाईल? किंवा कोणत्या वस्तूंना मागणी येऊ शकेल? याचे प्रमुख अनुमान करण्याची पध्दती सुरू झाली आणि उपभोक्त्याचे महत्त्व प्रथमच उत्पादकांच्या लक्षात आले. ज्यामुळे विक्रीला चालना मिळेल अशा प्रकारचे प्रयत्न उत्पादकांना आवश्यक वाटू लागले.
(५) ग्राहकाभिमुखी अवस्था (Consumer Oriented Stage): या अवस्थेला विपणनाच्या उत्क्रांतीतील शेवटचा टप्पा समजला जातो. विशेषत्वे १९ व्या आणि २० व्या शतकाच्या स्पर्धेचे स्वरूप आणि स्पर्धेचे स्वरूप आणि स्पर्धेचे प्रमाण खूपच बदललेले आहे. आजकाल बाजारपेठेत मागणीचे प्रमाण खूपच विस्तारलेले आहे. त्याचप्रमाणे एकाच वस्तूची निर्मिती करणारे अनेक उत्पादक आहेत. अशा परिस्थितीत गेल्या एक-दोन शतकांच्या कालावधीत विपणनातील धोके आणि अनिश्चितता वाढत चाललेली आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था गतिमान बनलेल्या आहेत. अशा बदलत्या काळाच्या पार्श्वभूमीवर कोणताही उद्योजक फक्त स्वत:चा स्वार्थ विचारात घेऊ शकत नाही. फक्त नफा आणि विक्री याच दोन गोष्टींचा विचार करणे आत्मघातकी स्वरूपाचे ठरते. ग्राहकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणे, त्यांना कायम स्वरूपात ’ग्राहक’ म्हणून टिकवून धरणे यासठी संकुचित दृष्टिकोन बाजूला ठेवावा लागतो. निदान बाह्यदर्शनी स्वरूपात आपण ग्राहकाच्या हितकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करतो हे प्रत्येक स्पर्धक उद्योजकाला दाखवावे लागते आणि त्यातूनच ग्राहकाभिमुखी विपणन हा दृष्टिकोन सर्व संमत ठरलेला आहे.
(६) समाजाभिमुखी विपणन अवस्था (Social Oriented Stage): विपणनात ग्राहक संतोष या दृष्टिकोनावर भर दिला जाऊ लागला. ग्राहकांच्या गरजा व आवश्यकतांनुसार उत्पादनात बदल केले जाऊ लागले. अधिकाधिक वस्तू व सेवांचा उपभोग करणे म्हणजे समाजात समृध्दीचे लक्षण मानले जाऊ लागले. असे असले तरी, समाजातील एक वर्ग हळूहळू जागृत होत असून पर्यावरण प्रदूषण व चंगळवाद आणि आर्थिक शोषण याबद्दलची मते तो मांडू लागला आहे. तसेच अनावश्यक खर्च टाळणे, ऊर्जेचा अपव्यय टाळा, इंधन बचत करा व प्रदूषण टाळा या विषयांवर सकारात्मक प्रचारही होऊ लागला.

१.१.२ विपणन या संज्ञेत समाविष्ट होणारे घटक
1) विपणन हे व्यावसायिक कार्य आहे.
2) विपणनात विनिमय प्रक्रिया अंतर्भूत आहे.
3) विपणन हे मानवी गरजा व आवश्यकतांच्या समाधानासाठी आहे.
4) उत्पादनानंतर उत्पादित वस्तू वा सेवांचा उपभोक्त्यापर्यंत होणारा प्रवास विपणनात आहे.
5) विपणन ही आर्थिक प्रक्रिया आहे.
6) विपणनात वस्तूच्या मालकी हक्कांचे हस्तांतरण अंतर्भूत आहे.
7) विपणनामुळे समाजाचे जीवनमान उचांवते.
8) विपणन ही एक व्यावसायिक प्रक्रिया आहे.
9) विपणनात वस्तू किंवा सेवांच्या भौतिक वितरणाच्या व्यवस्था अंतर्भूत आहे.

१.१.३ विपणनाची व्याप्ती
तीव्र स्पर्धेचे वातावरण आणि व्यापाराचे उदारीकरण यामधून बाजारपेठांचे आकारमान सतत वाढत गेलेले दिसते. स्थानिक बाजारपेठ, प्रादेशिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ आणि जागतिक बाजारपेठ असा विस्तार होता होता संपूर्ण जगच आता एक बाजारपेठ बनलेले आहे. या बाजारपेठेत देशोदेशीचे असंख्य उत्पादक आणि विक्रेते परस्परांशी स्पर्धा करताना दिसतात. प्रत्येक देश एकूण जागतिक व्यापारात आपला वाटा कसा वाढेल याचा विचार करताना दिसतो. कारण व्यापारवृध्दी आणि आर्थिक विकास या गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत.
बाजारपेठांचा जसा भौगोलिक विस्तार होत गेला आणि त्यातूनसार उत्पादक आणि उपभोक्ते यांच्यातील मध्यस्थांची साखळी विस्तारत गेली आणि त्यातूनच विपणन या संकल्पनेची व्याप्तीही वाढत गेलेली दिसते. औद्योगिक आणि वाणिज्याचे उत्क्रांती तसेच उत्पादन तत्रांत झालेले बदल, आनुषांगिक साधनांचा विकास (उदा. बॅंक व्यवसाय, वाहतूक व्यवसाय, साठवण, व्यापारी अभिकर्ते इत्यादी) या सर्वांचा परिणाम म्हणून विविध विपणन कार्यासंबधी अधिक सुक्ष्म पातळीवरून(Micro Trend) विचार करण्यास सुरूवात झाली. विपणी संशोधन (Market Reasearch) आणि विपणन संशोधन (Marketing Reasearch) अशा दोन वेगवेगळ्या शाखांत संशोधन कार्यावर अधिक भर देण्यास सुरूवात झाली. विपणनविषयक कार्ये विविध व्यक्ती आणि संस्था यातून विभागली गेली आणि त्याचाही परिणाम विशेषीकरणामध्ये झाला.
आजकाल विपणनविषयक कार्ये उत्पादक स्वतः करीत नाहीत. कारण स्पर्धात्मक वातावरणात वस्तूच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागते. विपणन कार्यांसाठी उत्पादक स्वतंत्र वेळ देऊ शकत नाहीत. त्यांच्याकडून मध्यस्थ स्वरूपात कामे करणाऱ्या संस्थांची मदत घेतली जाते. उदा., जाहिरात आणि प्रसिध्दी, वाहतूक आणि साठ्वण, विमा आणि अर्थसाहाय्य अशा वेगवेगळ्या संस्थांशी संपर्क ठेवला जातो. त्यांचा अनुभव व विषयातील सखोल ज्ञान यांचा उत्पादक स्वतःच्या संस्थेसाठी उपयोग करून घेतो. असा उपयोग करून घेताना तो विविध सेवांची किमंतही मोजतो.
विपणन या संकल्पनेची व्याप्ती गतिमान अर्थव्यवस्थेमुळे सातत्याने गेल्या पाच ते दहा दशकांत वाढतच गेलेली आहे. सद्दःपरिस्थितित आपल्याला, उत्पादकांना उपयुक्त ठरणाऱ्या संस्थांची साखळीच निर्माण झालेली दिसते. सहजीवन किंवा सहअस्तित्व (Expert Person) ही संकल्पना समाजात अधिक रूढ झालेली दिसते. सर्वच व्यावसायिक परस्परांची मदत घेऊनच आपली प्रगती करतात. स्पर्धेऎवजी सहकार्य हा दृष्टीकोन आताजवळपास सर्वमान्य आझे. त्यातूनच विपणन या संकल्पनेची व्याप्ती वाढत गेलेली आहे. या व्याप्तीला विशिष्ट आशी काळाची मर्यादा नाही. व्याप्ती सतत वाढत जाणारी आहे.


१.१.४ विपणनाचे महत्त्व
विपणन ही एक ’कार्याचा समूह’ (Group of Activities) दर्शविणारी संकल्पना आहे. उत्पादक आणि वितरक वस्तूंच्या प्रभावीपणे विक्रीसाठी काही कार्ये संयुक्तपणे आणि काही कार्ये स्वंत्रतपणे पार पाडत असतात, मात्र असे असले तरी अंतिम ध्येय दोघांच्याही बाबतीत एकच असते. ’अधिकाधिक विक्री’ आणि ’ ’अधिकाधिक नफा’ याबाबत दोघेही आपापल्या परीने स्वप्नपुर्ती करीत असतात. व्यवसातून नफा मिळवितात. यामधूनच विपणनाला (Marketing) महत्त्व प्राप्त होते. विपणनाचे महत्त्व प्रकारे स्पष्ट करता येईल.
(१) रोजगारसंधीत वाढ : काही जाणकार तज्ज्ञांच्या मते विपणन कार्ये (बांधणी, साठवण, वाहतूक, जाहिरात प्रसिध्दी इ.) अनेक औद्योगिक आणि व्यावसायिक संस्थातून रोजगार निर्माण करतात. कुशल त्याचप्रमाणे निम्नकुशल तसेच अकुशल कर्मचार्यांसाठी रोजगार उपलब्ध होतो. एका अंदाजाप्रमाणे सुमारे ४० कर्मचारी विविध विपणन प्रक्रियांशी संबधित असतात. जर्मनी, जपान व संयुक्त संस्थाने या देशांतून जाहिरात व प्रसिध्दी संस्था, वाहतूक विमा व्यवसाय, साठवण, घाउक आणि किरकोळ व्यापार करणारऱ्या संस्था यांमधून फार मोठा रोजगार उपलब्ध होतो. विक्रय कला व जाहिरात या क्षेत्रात तरुण, होतकरु व्यक्तींना आपले सुप्त गुण प्रकट करण्याची संधी मिळते. विपणन कार्ये हजारोंच्या उपजिविकेच्या साधने बनतात.
(२) प्रमाणित आणि दर्जेदार वस्तूंचे वितरण : विपणन प्रक्रियेत प्रमाणीकरण आणि प्रतवारी ही कार्ये समाविष्ट होतात. प्रमाणीकरणाचे कार्ये औद्योगिक वस्तूंच्या बाबतीत तर प्रतवारीचे कार्य शेती उत्पादनांच्या बाबतीत केले जाते. हलक्या प्रतीच्या वस्तू बाजारात येण्यापासून प्रतवारी आणि प्रमाणीकरण कार्याने प्रतिबंध केला जातो. आजकाल पुष्कळशा उत्पादनांवर ISO, I.S.I Maark आनी 'AGMAARK' दर्शविलेला असतो. अशी चिन्हे वस्तूंचा दर्जा स्पष्ट करतात. दर्जेदार वस्तूच बाजारात आल्याने त्यांना स्वतंत्र जाहिरात करावी लागत नाही. अशी उत्पादने आपली ओळख आपोआप पटवितात. दर्जेदार गुणवत्ता धारण करणारी उत्पादने विकल्याने विक्रेत्याची प्रतिष्ठा तर वाढतेच पण नागरिकांची राहणीमान पातळी उंचावण्यास साहाय्य मिळते.
(३) राष्ट्रीय उत्पनात भर : विपणन यंत्रणा जर प्रभावी असेल तर विक्रीला योग्य अशी वातावरणनिर्मिती आपोआप होते. वस्तू आणि सेवांच्या मागणीत सतत वाढ होते. वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादनात वाढ करावी लागते या सर्वांचा परिणाम म्हणजे राष्ट्रीय उत्पादनात वाढ होते. एकूण अर्थव्यवस्थेचे (आर्थिक) हितसंबंध पाहता राष्ट्रीय उत्पन्नात भर पडण्याला विशेष महत्त्व असते.
(४) व्यापारचक्रापासून (मंदीपासून) संरक्षण : व्यापारचक्र सतत उलट -सुलट गतीने, दिशेने बाजारपेठेत कार्यरत असते. व्यापारचक्राच्या गतीचे - दिशेचे परिणाम सर्व व्यावसायिकांना कमी - अधिक प्रमाणावर जाणवतात. याचे कारण पुष्कळसे व्यवसाय परस्परांवर अवलंबित असतात. विपणन कर्ये मंदीच्या प्रवृत्तीस रोखून धरतात. विपणन कार्यामूळे (जाहिरात, प्रसिध्दी. विक्रय कला इत्यादी) समाजात एक प्रकाराची जाणीव - जागृती निर्माण होते. समाजाला आपल्या गरजांची सतत जाणीव करून दिली जाते. यातून मागणी वाढते. उत्पादन वाढते आणि व्यावसायिक व उत्पादनसंस्थांची घसरण (Depression or Downword Trend) रोखून धरली जाते. मंदीच्या काळात पुष्कळसे छोटे उद्योग बंद पडतात, कर्मचार्यांवर ’नोकरकपाती’ ची आपत्ती येते. मोठ्या औद्योगिक संस्थांकडून पुरेशी मागणी मिळत नाही. विपणन कार्ये म्हणजे ’सामूहिक कृती’ व्यापारचक्रापासून संरक्षण पुरविते.
(५) वितरण खर्चात बचत : विपणन कार्यामुळे वितरण खर्चात बचत होते. उदा., वाहतूककार्य यासाठी जलद, वेगवान आणि सुरक्षित वाहतूक साधने वापरली जातात. रेल्वे-वाहतूक, मालट्रक यांतून जास्तीत जास्त मालाची वाहतूक केली जाते. जाहिरात आणि प्रसिध्दी या कार्यामुळेसुध्दा वितरण खर्चात बचत होते. प्रत्येक वस्तूमागचा सरासरी वितरण खर्च कमी होतो. सुरुवातीस जरी वितरणखर्च जास्त वाटला तरी कालांतराने मागणी जसजशी वाढत जाते तसातसा वितरण खर्च कमी होतो. मात्र हा विपणन कार्याचा दीर्घकाळातच मिळणारा फायदा आहे.

व्यावसायिक संस्था, समाज, ग्राहक व उत्पादक यांच्या दृष्टीने उत्पादनाचे महत्त्व पुढीलप्रमाणे -
(१) व्यवसायाचे नियोजन आणि निर्णय घेण्याच्या कामी मदत मिळते. विशषतत्वे उत्पादन व सग्रहण यांविषयी नेमकी कोणती धोरणे ठारविता येतात. विक्रीविषयक अनुमान (Sales Forecast) करता येते. जेवढ्या प्रमाणात वस्तू विकल्या जाण्याची शक्यता आहे तेवढ्याच प्रमाणात उत्पादन करण्याचा निर्णय संस्था घेते. खरेदी, वित्तपुरवठा व गुंतवणूक यासंबंधीचे निर्णयसुध्दा विपणन कार्याशी दुरान्वये संबंधित असतात.
(२) नफ्याचे किंवा लाभाचे प्रमाण वाढविण्याकरितासुध्दा विपणन कार्याचा उपयोग होतो. विक्री खर्चात (Selling Cost) बचत होते. जाहिरात व प्रसिध्दीने मागणीत वाढ होते त्यामुळे संस्थेचा लाभ होतो.
(३) विपणन कार्ये उत्पादनसंस्थेचा बाह्य जगाशी संपर्क दुवा ठरतात. जाहिरात संस्था, वाहतूक संस्था, संग्रहण सेवा देणार्या संस्था, बांधणी साहित्य पुरविणार्या संस्था यांच्याशी उत्पादकसंस्थेचा संबंध येतो. घाउक व्यापारी, किरकोळ व्यापारी व निर्यात संस्थेशी घनिष्ठ स्वरूपाचे जवळून संबंध येतात. मध्यस्त यंत्रणेचा वापर करण्याचे वर्तन, स्पर्धकांची उत्पादने व स्पर्धकांची किंमत धोरणे यांविषयी माहिती कळते.
समाजाच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व
(१) राहणीमान उंचावते : विपणनामुळे उत्पादनांना मागणी निर्माण होते आणि लोकांचे राहणीमान उंचावते. नवीन तंत्रज्ञानाच्या वस्तू व सेवा ग्राहकांना उपलबध्द झाल्याने एकूण समाजाच्या जीवनशैलीचा दर्जाही बदलतो. पॉल मझूर यांच्या मते, "विपणन म्हणजे समाजाच्या जीवनमानाची निर्मिती होय."
(२) विपणनामुळे रोजगारनिर्मिती होते : विपणन संशोधन, घाउक व किरकोळ व्यापार, वाहतूक, दळणवळण, साठवण, संग्रहण व प्रसिध्दी वैगेरे असंख्य कामांमध्ये विपणनामुळे रोजगार प्राप्त होतो.
(३) वितरण खर्चात कपात : अधिकाधिक ग्राहकांपर्यंत वस्तू किंवा सेवांचा पुरवठा करताना वितरण खर्च कमी करणे हे विपणनाचे ध्येय असते. वितरण खर्च कमी झाल्याने उत्पादनाच्या विक्री किंमतीतही घट करता येते व समाजाची उपभोग पातळी वाढविता येते. वितरण खर्चात घट झाल्यामुळे वस्तू स्वस्त किंमतीला विकता येतात.त्यामुळे समाजातील दुर्बल घटकालाही या वस्तू खरेदीचा फायदा घेता येतो किंवा वस्तूच्या वितरण खर्चात होउनही विक्री किंमत कमी केली नाही तर व्यवसायसंस्थेचा नफा वाढतो आणि हा वाढलेला नफा कामगार कर्मचार्यांना पगारात वाढ व भागधारकांना अधिक लाभांश याद्वारे पुन्हा समाजाला देता येतो.
(४) राष्ट्रीय उत्पनात वाढ : विपणनामुळे अर्थव्यवस्थेत चैतन्य निर्माण होते. समाजाचे राहणीमान आणि त्यामुळे कार्यक्षमता उंचावते व त्याचा फायदा राष्ट्रीय उत्पादनवाढीत होतो.

ग्राहकांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व
(१) ग्राहकांना शिक्षण मिळते : विपणन प्रक्रिया जेवढी समृध्द, प्रगत व विकसनशील असते तेवढे ग्राहक शिक्षण होण्याचे प्रमाण अधिक असते. प्रगत विपणन तंत्रामुळे समाजाचे एक प्रकारे शिक्षण होत असते. निरोगी विपणन स्पर्धेमुळे ग्राहकाचे ज्ञान अधिक उंचावते. नव्या तंत्रप्रणालीची माहिती त्याल मिळते.
(२) किंमतीचा फायदा : विपणन प्रगत नसते तर दूरवर वस्तू न पोहोचता त्या उपलब्ध असतील तेथून असेल त्या किमतीस ग्राहकांना खरेदी कराव्या लागल्या असत्या; परंतु प्रगत विपणनामुळे अगदी जवळच्या अंतरावर व योग्य किमतीस वस्तू उपलब्ध होतात.
(३) आवडीप्रमाणे वस्तूंचा उपलब्धता : विपणनामुळे विविध प्रकारच्या, नव्या फॅशनच्या व नवीन रंग-रूप-गंध-आकारांच्या वस्तू बाजारपेठेत उपलब्ध होतात. त्यामुळे ग्राहकांना आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करता येतात.
(४) वस्तूसेवांची उपलब्धता : विपणनामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार हव्या असणार्या वस्तू वा सेवा सहज उपलब्ध होउ शकतात. विपणनामुळे विविध देशांत तयार होणाऱ्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचतात.
(५) ग्राहकांची फसवणूक होत नाही : प्रगत विपणनामुळे अनेक वस्तू बाजारपेठेत उपलब्ध होतात. शिवाय वस्तूंच्या किंमतीत खूप मोठी तफावत राहत नाही. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत नाही.

उत्पादकांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व
(१) नफा वाढतो : प्रगत विपणनामूळॆ व्यवसायसंस्थेचा वस्तू वा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचतात. विपणन व्यवस्थेमुळे व्यवसायसंस्था महत्तम नफ्याचे आपले उदिष्ट गाठू शकते. एका बाजूने विपणनामुळे विक्री किंमतीत घट करता येते तर दुसर्या बाजूने जाहिरात व विक्रयवृध्दीच्या साहाय्याने विक्रीचे प्रमाण वाढवून एकूण नफ्यात वाढ साधता येते.
(२) संदेशवहनाचे कार्य : विपणनामुळे ग्राहकांना नव्या उत्पादनांची, तंत्रज्ञानाची महिती मिळते. उत्पादकांला ग्राहकांच्या बदलत्या आवडी - निवडीची माहिती मिळते. मध्यस्थांना ग्राहक व उत्पादक दोन्ही बाजूंकडून माहिती मिळते.
(३) संदेशवहनाचे कार्य : विपणनामुळे ग्राहकांची संख्या वाढते. मध्यस्थांशी व्यापार वाढतो. त्यामुळे व्यवसायसंस्थेची संघटनात्मक बांधणी भक्कम होते. नफ्यात वाढ होते, उत्पादन वाढते, कामगारांना पगारवाढ करता येते तर भागधारकांना चांगला लाभांश देता येतो त्यामुळे व्यवसायास स्थैर्य प्राप्त होते.
(४) नियोजन व निर्णय प्रक्रियेस साहाय्य : व्यवसायसंस्थेच्या संदर्भातील नियोजन व निर्णय प्रक्रियेस विपणन साहाय्य्कारी ठरते. सध्याच्या काळात विक्रीच्या अंदाजावरून किती उत्पादन करायचे हे ठरविता येते.

विपणनाचे फायदे
1) विपणनामुळे मूळ उत्पादक व अंतिम उप्भोक्ता यांची साखळी जोडली जाते. त्यामुळे विनिमय प्रक्रिया सुलभ होउन तिला चालना मिळते.
2) विपणनामुळे संग्रहण कार्य होते. संग्रहणामुळे हंगामी उत्पादन असणार्या वस्तूसुध्दा वर्षभर ग्राहकांना उपलब्ध होउ शकतात.
3) विपणनामुळे अर्थव्यवस्थेत चैतन्य प्राप्त होते. अर्थचक्रास गतिमान ठेवण्याचे कार्य विपणनामुळे सुरळीत होते.
4) उत्पादनामुळे रूप स्वरूपात (Form Utility) उपयुक्तता मूल्य निर्माण होते. विपणनामुळे स्थळ, काळ व मालकी किंवा ताबा या संदर्भातील उपयुक्तता मूल्याची निर्मिती होते.
5) विपणनामुळे वस्तू वा सेवांचे भौतिक वितरण व मालकी हस्तांतरण सुलभ होते.
6) विपणनामुळेच वस्तूच्या प्रमाणीकरणास प्रोत्साहन मिळते. रंग, वजन, दर्जा, चव व आकार इत्यादी विविध घटकांच्या आधारावर प्रमाणीकरण होते. त्यामुळे वस्तूची निवड करणे ग्राहकांना सुलभ होते.
7) विपणनामुळे उद्योजकता विकासास चालना मिळते.
8) विपणनामुळे माहितीचे आदान - प्रदान सुलभ होते. बाजारपेठेविषयक माहितीच्या गतीमुळे व्यापारी - मध्यस्थ, ग्राहक व उत्पादन अशा सर्वांना फायदा होतो.
9) विपणनामुळे वाहतूक, जाहिरात, मध्यस्थ, संग्रहण, बाजारपेठ, संशोधन व दळणवळन अशा विविध क्षेत्रांत नवीन रोजगार्निर्मिती होत राहते.
10) विपणनामुळे मागणीची वृत्ती प्रबळ होते. त्यामुळे विकसनशील देशांतील आर्थिक व सामाजिक अभिसरणास वेग येतो.

१.१.५ विपणनाच्या मर्यादा
व्यावसायिक संस्थेचे किंवा उत्पादकसंस्थेचे स्वरूप कोणत्याही प्रकारचे असो विपणन कार्य अटळ स्वरूपाचे असते. या कार्याच्या अभावी कोणत्याही वस्तू किंवा सेवा बाजारपेठेत परिणामकारकपणे ग्राहकांपर्यंत नेत येत नाहित आणि वस्तू विक्रीचे उदिष्ट साध्य करता येत नाही. प्रत्येक उत्पादकाला (शेतीक्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र यातील निर्माता व्यक्ती किंवा संस्था) वर्गीकरण, प्रमाणीकरण, प्रतवारी, संवेष्टन, निश्चित किंमत व जाहिरात ही कार्ये करावीच लागतात, पण अशी सर्व कार्ये केवळ उत्पादक एकटाच करू शकत नाही. असे केले तर त्याचे उत्पादन कार्यावरचे लक्ष विकेंद्रीत होइल. उत्पादक याकरिता विविध व्यक्तींची किंवा संस्थांची मदत घेतो. तरीसुध्दा विपणन कार्य सुरळीतपणे पार पडेलच असे सांगता येत नाही. विपणन कार्याच्या मर्यादा पुढीलप्रमाणे जाणवतात.
(१) आर्थिक स्वरूपाची मर्यादा : विविध विपणन करण्याकरिता उत्पादकांचा पैसा खर्च करावा लागतो. बांधणी कार्य, साठवण कार्य, वाहतूक, जाहिरात आणि विविध आणि अभिकर्त्यांच्या सेवा या सर्वांचा मिळून एकूण होणारा खर्च मोठ्या प्रमाणात असतो. छोटे उद्योजक आणि कारखानदार यासाठी स्वतंत्र आर्थिक व्यवस्था करू शकत नाहित. त्यांना खेळत्या भांडवलाची कमतरता भासते. जर या कार्यांसाठी त्यांनी पैसा खर्च केला तर उत्पादन कार्यासाठी पुरेसे भांडवल शिल्लक राहत नाही.
(२) व्यावसियकांचे परावलंबित्व : विपणन कार्याच्या बाबतीत दुसरी मर्यादा म्हणजे उत्पादकांचे किंवा व्यावसायिकांचे पराविलंबित्व वाढते. विविध संस्था आणि मध्यस्थ यांची मनधरणी करावी लागते. प्रसंगी जास्त किंमतही मोजावी लागते. उदाहरणार्थ, वाहतूक संस्थेच्या सेवा जर रेल्वे किंवा मोटार वाहतूक क्षेत्रात संपाचे किंवा बंदचे वातावरण असेल तर वाहतूक व्यवस्थेअभावी बाजारात वस्तू वितरित करता येत नाहित.
(३) संस्थात्मक प्रगतीचा अभाव : भारतासरख्या देशात विशषतत्वे ग्रामीण भागात मध्यस्थ संस्थांचा विकास अल्प प्रमाणात झालेला दिसतो. जाहिरात संस्था, साठवण व्यवस्था, मध्यस्थ सेवा (Agency Service) संस्था, शहरांमध्ये जितक्या विकसित अवस्थेत आहेत तेवढा विकास ग्रामीण भागात किंवा शहरांच्या उपनगरात झालेल्या नाही. तसेच या विविध संस्था आपल्या सेवा खर्चात (Service Charges0 सतत वाढ करतात त्यामुळे उत्पादकाचा खर्च वाढतो. हा खर्च वस्तूंच्या किंमतीतून पुष्कळदा भरून काढणे शक्य नसते. कारण वस्तूंच्या किंमती वाढविल्या तर वस्तूंची स्पर्धा क्षमता कमी होते.
(४) बदलते तंत्रज्ञान : व्यवसायाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये सातत्याने सुधारणा होत आहेत. नवीन ज्ञानाची आणि पध्दतीची भर पडते आहे. गतिमान अशा स्वरूपात बाह्य पर्यावरण बदलत असताना प्रत्येक संयोजक या बदलांशी लगेच मिळवून घेउ शकत नाही. तंत्रज्ञान आत्मसात करण्याकरिता प्रशिक्षणाची गरज असते, पण प्रत्येक संयोजक त्यासाठी स्वतंत्र वेळ देउ शकत नाही. यामुळे पुष्कळसे उद्योजक पुर्णतः मध्यस्थ संस्थांवर अवलंबून राहतात ज्याचा गैरफायदा घेतला जाणे शक्य असते.
(५) विकास आणि संशोधन : विपणन कार्य हे चिरस्थायी स्वरूपाचे नाही. बदलत्या काळाप्रमाणे विविध क्षेत्रांत नवीन साधनांची आणि तंत्राची भर पडत आहे. स्पर्धात्मक वातावरणात आपला व्यवसाय टिकवून धरण्याकरिता आधूनिकता आणि यांत्रिकीकरण यावर भर द्यावा लागतो. व्यावसायिकाला व उद्योजकाला बदलत्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवावे लागते. सातत्याने महिती गोळा करावी लागते. स्पर्धकांच्या वस्तूंचा विश्लेषणात्मक अभ्यास करावा लागतो. विकास आणि संशोधन विभाग स्वतंत्रपणे स्थापन करावे लागतात. व्यवसायातील गुंतवणूकीचे प्रमाण वाढवावे लागते. जे सर्व उद्योजकांना सहजपणे शक्य होत नाही.

संकलन- तुषार ओव्हाळ,बी.एम.एम.तृतीय वर्ष. एस. के. सोमैय्या महाविद्यालय,विद्याविहार.

Tuesday, March 30, 2010

(Media effects) मीडिया इफेक्ट्स - माध्यम परिणाम

(Media effects) मीडिया इफेक्ट्स - माध्यम परिणाम : माध्यमांचा परिणाम वाचक/प्रेक्षकांवर होतो काययाबाबत मतभिन्नता आहे. एका अर्थाने माध्यम परिणाम हे स्वयंसिद्धच आहे. हवामानवृत्ताचा आपल्यावागण्यावर परिणाम होतोच. गाड्या किंवा विमाने उशीरा धावताहेत, परिसंवाद कुठे आहेत, कोण काय बोलले, कसेवागले या सगळ्या बातम्यांमुळे आपल्यावर परिणाम होतो. चित्रपटांचे नट, नटी यांच्या वागण्याचा, कपड्यांचापरिणाम आपल्या वागण्यावर होतो. हा सगळा आपला नेहमीचा अनुभाव आहे. मात्र माध्यमांचा परिणाम कितीआणि कसा होतो याबाबत एकमत नाही. काही अभ्यासकांनुसार माध्यमांचा अगदी प्राथमिक स्वरूपचा परिणामव्यक्ती किंवा समाजावर होतो.
माध्यमांचा, विशेषत: टीव्ही या माध्यमाचा परिणाम, हा नकारात्मकच होतो असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. हिंसा, मैथुन, दंगली, जातीय, वांशिक, धार्मिक विषमता पसरवणे, दंगलीचे लोण पसरवणे, भीती पसरवणेइत्यादींच्या बाबतीत अनेकदा माध्यमांना दोषी धरले जाते. समाजातील वाईट प्रवृत्ती पसरवण्यात माध्यमांचाहातभार लागतो हा समज गेली अनेक दशके मान्य झाला आहे.
माध्यम परिणाम ही संकल्पना माध्यम अभ्यासातील 'हायपोडर्मिक मॉडल' सिद्धांत मांडते. या सिद्धांतानुसारएखाद्या सुईने जसे औषध थेट आपल्या नसात पोहोचवले जाते त्याप्रमाणे माध्यमे माध्यम संदेश आपल्याडोक्यात पोहोचवतात. हा सिद्धांत असे गृहित धरतो की वाचक/प्रेक्षक हे निष्प्रभ असतात. प्रत्यक्षात मात्रवाचक/प्रेक्षक हे निमूटपणे संदेश ग्रहण करत नसतात तर संदेशांना स्वत:चे अर्थ लावतात आणि आपआपल्यामताप्रमाणे, गरजेप्रमाणे, कुवतीप्रमाणे त्यावर निर्णय घेतात. या आक्षेपामुळे 'हायपोडर्मिक मॉडल' हा सिद्धांतआता मागे माध्यम अभ्यासात मागे पडत चालल आहे. असाच एक माध्यम परिणाम सांगणारा सिद्धांत आहेयूझेस ऍन्ड ग्रॅटिफिकेशन्स'चा सिद्धांत. ब्लुम्लर आणि काट्ज यांनी हा सिद्धांत सर्वप्रथम मांडला. खरेतर हा वेगळासिद्धांत नसून माध्यम अभ्यासाकडे वाचक/प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून पाहण्याच्या ज्या अनेक प्रक्रिया तयारझाल्या त्यांचा समन्वय आहे. या सिद्धांतानुसार माध्यमांचे वाचक/प्रेक्षक हे माध्यमांची आणि त्यांच्या संदेशांचीआवश्यकतेनुसार आणि समाधानप्राप्तीसाठी निवड करतात. हा सिद्धांत असे गृहित धरतो की वाचक/प्रेक्षकांसमोरमाध्यमांची निवड करण्यासाठी पुरेसे पर्याय उपलब्ध असतात.
अधिक माहितीसाठी वाचा:
Blumler J.G. & Katz, E. (1974). The uses of mass communications: Current perspectives on gratifications research. Beverly Hills, CA: Sage.
Gauntlett, David (1995a), Moving Experiences: Understanding Television's Influences and Effects, John Libbey, London.
Bryant, Jennings, Zillmann, Dolf (2002) Media effects: advances in theory and research, Lawrence Erlbaum Associates
Schecheter, Danny, McChesney, Robert W., Brown, Jackson Jr.(1999) The More You Watch, The Less You Know, Seven Stories Press. '

(Journalism) जर्नलिझम - पत्रकारिता

(Journalism) जर्नलिझम - पत्रकारिता : वर्तमानपत्रे, रेडिओ, टेलिव्हिजन आणि माहिती महाजालाद्वारे शोधूनकाढलेली माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे याला सर्वसाधारणपणे पत्रकारिता असे म्हणतात. पत्रकारिताही एखादी वस्तू किंवा उत्पादन नव्हे तर एक प्रक्रिया आहे. काही दशकांपूर्वी ही प्रक्रिया एकतर्फी समजली जातहोती ज्यात पत्रकार जे सांगत होते ते प्रेक्षक ग्रहण करत होते. आता प्रेक्षकही या प्रक्रियेत सहभागी होतात, त्यांच्याकडे पाठवलेले संदेश स्वत:च्या अनुभवांच्या आधारे पडताळून पाहतात आणि त्या संदेशाबाबत स्वत:चेअनुमान काढतात.
पत्रकारितेच्या सामाजिक उद्दिष्टांबाबत खूप लिहिले गेले आहे. मॅक्नायरच्या मता प्रमाणे प्रत्यक्ष जगाचापत्रकाराने स्वत:पुरता अनुभवलेला आणि केलेला खुलासा, त्यावर एखाद्या माध्यमाच्या विशिष्ट आवश्यकतालक्षात घेऊन केलेले संस्कार ज्यायोगे तो अनेक लोकांना सांगता येईल या प्रक्रियेला पत्रकारिता म्हणतात. मॅक्वेलम्हणतो पत्रकारिता म्हणजे पैसे घेऊन केलेले लिखाण आणि दृकश्राव्य माध्यमांच्या बाबतीत असे जन माध्यम जेसर्वसामान्यजनांसाठी प्रसंगोचित नुकत्याच घडलेल्या घटना सांगते.
पत्रकारिता ही सर्वसामान्य लोकांना त्यांच्या भोवती असलेल्या जगाची जाण करून देणारी आणि त्या जगाशी कसेवागावे याबाबतचे निर्णय घेण्यासाठी लागणारी माहिती पुरविणारे साधन आहे हा विचार आता खूप बदलला आहे. पत्रकारितेच्या प्रक्रियेतून आता माध्यम संस्थांना माहितीचे पैशात मूल्य स्पष्ट कळले आहे. त्यामुळे पत्रकारिता हीकेवळ एक प्रक्रिया राहिली नसून त्यातून निघणारी माहिती, विश्लेषण, प्रतिमा, रचना इत्यादी हे पत्रकारितेच्याप्रक्रियेचे उत्पादन म्हणून आता ओळखले जाते आणि याचे मूल्य समाजातील वेगवेगळ्या स्तरावर आकारले जातेआहे. पत्रकारितेच्या प्रक्रियेला लागणारा पैसाही आता अनेक पटींनी वाढला आहे. जी के चेस्टर्टन यांनी पत्रकारितेचीव्याख्या करताना म्हटले की पत्रकारिता म्हणजे 'लॉर्ड जोंस मेला आहे' हे त्या लोकांना सांगणे ज्या लोकांना लॉर्डजोंस जिवंत होता हे सुद्धा माहिती नव्हते. पत्रकारिता म्हणजे आपली ती सहजप्रवृत्ती ज्यामुळे आपण रस्त्यावरघडलेल्या अपघाताकडे गर्दीत मान उँचावून पाहण्यास उद्युक्त होतो अशी परिभाषा सिम्प्सनने केली. अलिकडेपत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपामुळे कंड्या पिकवणारी पत्रकारिता, नव पत्रकारिता, शोध पत्रकारिता, टॅब्लॉइडपत्रकारिता असे पत्रकारितेचे प्रकार केले जाताहेत.

अधिक माहितीसाठी वाचा:

Curran, J and Seaton, J (1997) Power without Responsibility, Routledge.
Franklin B (1997) Newszak and News Media, Arnold.
Harcup, T (2004) Journalism:Principles and Practice, Sage
McNair, B, Hibberd, M and Schlesanger, P (2002) 'Public Access Broadcasting and Democratic Participation in the Age of Mediated Democracy', Journalism Studies, 3(3): 407-22.
McQuail, D (2000) Mass Communication Theory, Sage
Randall, D (2000) The Universal Journalist, Pluto
Simpson, J (2002) News from No Man's Land: Reporting the World, Macmillan.

(Ethics in Journalism) एथिक्स इन जर्नालिझम

(Ethics in Journalism) एथिक्स इन जर्नालिझम - पत्रकारितेतील नैतिकता : माहिती मिळवताना आणिमाध्यमांद्वारे ती प्रसारित करताना कुठल्या मूल्यांचे पालन करावे ज्यायोगे ती दुसर्यां ना क्लेषकारक, अन्यायकारक, बदनामीकारक असणार नाही याची काही मूलभूत तत्त्वे पत्रकारितेत सर्वमान्य आहेत. यामूल्यांमुळेच पत्रकारिता केवळ व्यवसाय नसून एक सामाजिक बांधिलकी आहे या विचाराला बळ मिळते. यानैतिकतेचे दोन उद्देश्य आहेत. पहिले म्हणजे पत्रकारिता ही सार्वजनिक हितासाठी आहे. एखादी बातमी सांगण्यातसार्वजनिक हित आहे हे पत्रकाराला त्या त्या देशाच्या कायद्याच्या कक्षेत सिद्ध करता आले पहिजे. दुसरे म्हणजेएखादी बातमी सांगत असताना ती मिळवताना आणि प्रसारित करताना पत्रकाराने हा भरवसा दिला पाहिजे कीत्याने आवश्यक कायदेशीर नैतिक बाबींचा विचार केला आहे, काळजी घेतली आहे. अशी काळजी आपण घेतलीहे देखील त्या त्या देशाच्या कायद्याच्या चौकटीत सिद्ध करण्याची जबाबदारी पत्रकाराची असते. त्याचबरोबरबातमी अचूक असली पाहिजे, निश्पक्ष असली पाहिजे ही जबाबदारी सुद्धा पत्रकाराची असते.
आल्बर्ट कामू या फ्रेंच लेखक-पत्रकाराने 1957 साली साहित्यासाठीचे नोबेल पुरस्कार स्वीकारताना म्हटले होते कीपत्रकारांची वैयक्तिक कमजोरी काहीही असो, त्यांच्या कामाचा उमदेपणा हा अशा दोन निष्ठांमधे आहे ज्या पाळणेकठीण आहे. पहिली म्हणजे आपल्याला जे माहिती आहे त्याबाबत खोटे बोलण्यास नकार देणे आणि दुसरी म्हणजेशोषणाचा प्रतिकार करणे. वर्तमान काळात पत्रकारांपुढे अनेक नैतिक आव्हाने आहेत. यातील पहिले आव्हान आहेते पत्रकारिता आणि राज्य यांच्यातील नात्यातील बदलत्या कक्षा. राज्याच्या भौगोलिक सीमा असतात मात्रपत्रकारांचे जग माहिती तंत्रज्ञानामुळे आता वैश्विक झाले आहे.
प्रत्येक व्यक्तीचे एक खाजगी क्षेत्र असते आणि लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला अशा खाजगी क्षेत्राचा अधिकारअसतो. पत्रकारिता जेव्हा माहितीचा, विचारांचा आणि अभिव्यक्तीचा अधिकार बजावते त्यावेळेस तिचा अशाखाजगी क्षेत्रात अधिक्षेप होतो. हा अधिक्षेप कितपत योग्य आहे हा नैतिकतेचा प्रश्न आहे.
पत्रकारितेचा संबंध वास्तवाशी, सत्याशी आहे. मात्र वास्तविकता कोणाची, सत्य कोणाचे हे नैतिकतेची प्रश्नहाताळावे लागतात. अशा परिस्थितीत उद्याच्या पत्रकारांसमोर हा प्रश्न आहे की पत्रकारिता करून ते जे निर्माणकरतात ती केवळ एक विक्रीमूल्य असलेली वस्तू आहे की त्यापेक्षा अधिक काही तरी?


Jeremy Iggers, (1998) Good News, Bad News - Journalism Ethics and the Public Interest, New York, Westview Press.
Elliot D. Cohen and Deni Elliott (1998) Journalism Ethics -- A Reference Handbook
Hausman, Carl. (1992) Crisis of Conscience - Perspectives on Journalism Ethics, New York, Harper Collins
Sanders, Karen (2003) Ethics & Journalism, London, Sage Publications.
Steven R. Knowlton, Patrick R. Parsons,(1995), The Journalist's Moral Compass: Basic Principles, Praeger.

(Communication) कम्युनिकेशन - संदेशनव्यवस्था/संज्ञापन

(Communication) कम्युनिकेशन - संदेशनव्यवस्था/संज्ञापन : एकमेकांना ओळखीची असलेली चिन्हेवापरून केलेली परस्पर क्रिया. या विषयाचा अभ्यास विसाव्या शतकात इतका व्यापक झाला की जवळ जवळसर्वच विषयांमधे याचा अंतर्भाव व्हायला लागला. युरोपीय संरचनावाद आणि रशियातील आकारवादातून सर्वमानवी भाषांमधे मूलभूत संरचना असते असा विचार पुढे आला. भाषांमधे सर्वसाधारणपणे विविध चिन्हके कुठलीआणि ती काही विशिष्ट संरचनेत कशी येतात या बद्दलचे सिद्धांत सॉस्युअने मांडले. या अभ्यासातून विविधचिन्हकांच्या व्यवस्थांचा अभ्यास भाषा आणि साहित्याच्या अभ्यासात सुरू झाला. लोक कथा, चित्रपट, नाटकयांमधील अशी चिन्हक आणि त्यांची केलेली उपाययोजना यांचा अभ्यास सुरू झाला.
याचदरम्यान अमेरिकेत तुलनात्मक भाषाशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. बेंजामिन ली व्हॉर्फ आणि एडमंड सापीरयांनी विविध भाषा यांच्यात तुलनात्मक नातं असतं असा विचार मांडला. भाषांमुळे दृष्टिकोन तयार होतात आणिविविध भाषांमुळे एकाच वास्तविकतेचे विविध दृष्टिकोन तयार होतात असा विचार मांडला गेला. वेगवेगळ्यासंस्कृतीत राहणारे लोक वेगवेगळी भाषा बोलतात आणि त्यांची वास्तविकता वेगवेगळी असते. मुंबई हे एकबहुभाषिक आधुनिक शहर आहे की अनेक गावांचं एक कडबोळं असा प्रश्न निर्माण होण्यामागे भाषांमुळे तयारहोणार्याह वेगवेगळ्या संस्कृती आणि मुंबई नावाच्या एकाच वास्तविकतेबाबतचे विविध दृष्टिकोन आहेत.
फ्रांसमधील संरचनात्मक मानववंशशास्त्रज्ञ क्लॉड लेवाय स्ट्रॉस याने संदेशनव्यवस्थेला संस्कृतीच्या लग्न आणिधन या दोन पैलूंशी जोडलं. भाषांमधे आणि कलेमधे चिन्ह, नातेसंबंधांमधे स्त्रिया आणि अर्थव्यवस्थेत धन यांचेअभिसरण मूलत: एकाच प्रकारची संरचना दर्शवतात आणि यातून मानवी मनाचे काही वैश्विक पैलू स्पष्ट होतात.
अमेरिकेतील समाज शास्त्राचा अभ्यास आधुनिक जीवनाच्या सूक्ष्म प्रक्रियांचा अभ्यास करण्याकडे वळला तेव्हासंदेशनव्यवस्था पहिल्यांदा औपचारिकरित्या अभ्यासली गेली. एकीकडे घटनात्मक आणि व्यावसायिक दृष्ट्यासार्वभौम तर दुसरीकडे व्यावसायिक आणि राजकीय दृष्ट्या आणि एकमेकांपासून अनभिज्ञ असा आधुनिकसमाज स्वत:शी आणि इतरांशी संवाद कसा साधतो, या प्रश्नाकडे व्हॅंस पॅकार्ड, मायकल शुड्सन सारख्याअभ्यासकांनी लक्ष वेधले. अशा जन समाजात जन माध्यमांचे महत्त्व वाढले ते जाहिरात, पत्रकारिता, जनसंपर्क, प्रचार इत्यादींमुळे. जन मनोरंजनाचा या अनोळखी पण सार्वभौम व्यक्तींवर होणारा परिणाम हा महत्त्वाचा विषयठरला.
संदेशनव्यवस्था आणि माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार वाढत गेला आणि मग व्यावसायिक अभ्यासक्रमातही संज्ञापनहा विषय महत्त्वाचा झाला. उत्तराधुनिक अमेरिका, जपान आणि यूरोप येथे ग्राहकांच्या वागण्याचा सखोलअभ्यास संदेशनव्यवस्थेच्या अभ्यासामुळे शक्य झाला आणि हे देश आर्थिक दृष्ट्या पुढारले. त्याचवेळी सामान्यनागरिकांना आपले लोकशाही हक्क बजावण्यासाठी आणि नागरी समाज राजकीय सामाजिक दृष्ट्या सक्षमकरण्यासाठी माध्यम, जनसंपर्क आणि जाहिरात यांचा अभ्यास अमेरिकेतील अभ्यासक्रमांमधे समाविष्टकरण्यात आला.
कॅनडा येथील मार्शल मॅक्लुहान या वाङ्मयीन इतिहासाच्या अभ्यासकाने मानसशास्त्र आणि हॅरॉल्ड इनिस याच्यासंज्ञापन तत्त्वज्ञानाचा उपयोग करून संदेशनाच्या अवास्तव प्रसारणाचे सिद्धांत मांडले. मॅक्लुहानची सहज शैलीअभ्यासक, माध्यम, जाहिरात आणि टेलिव्हिजन व्यावसायिक आणि सामान्य वाचकांनाही आवडली.
याचवेळी राज्यकर्ते आणि सरकारे यांनाही संज्ञापनाची आवश्यकता, प्रसार, परिणाम याचा अंदाज यायला लागला. शीत युद्ध असो वा आफ्रिकापासून व्हिएतनामपर्यंतचे स्वातंत्र्यसंग्राम असो या सगळ्यात संज्ञापनाची भूमिकाअभ्यासण्याजोगी होती हे लक्षात येऊ लागले. विशेषत: सैनिकी सामर्थ्य वापरून संघर्ष जिथे होतो तेथे आपआपलीबाजू कशी योग्य आहे हे दर्शविण्यासाठी संज्ञानाचा उपयोग झाला.
रेमण्ड विलियम्स, मार्कूस आणि एंझंसबर्जर या अभ्यासकांनी संदेशन अभ्यासाला शास्त्रीय टीकात्मक दृष्टी दिलीआणि संदेशनव्यवस्था अभ्यासाला बौद्धिक आणि तात्त्विक अधिष्टान प्राप्त करून दिले.
या सगळ्या साथ मिळाली ती उत्तरोत्तर प्रगती होत गेलेल्या माहिती तंत्रज्ञानाची ज्यामुळे संदेशनाचे स्वरूप आणिआवाका वाढतच गेला आहे.

अधिक माहितीसाठी वाचा:


पाटणकर, वसंत (2006), साहित्यशास्त्र: स्वरूप आणि समस्या, पद्मगंधा प्रकाशन.
मालशे, मिलिंद (2004), आधुनिक भाषाविज्ञान: सिद्धांत आणि उपयोजन, लोकवाङ्मय गृह
Levi-Strauss, Claude (1964) Structural Analysis in Linguistics and Anthropology in Hymes.
Sapir, Edward (1958) Selected Writings of Edward Sapir in Language, Culture and Personality (Ed by DG Maandelbaum), Berkeley, California, University of California Press.
Saussure, Ferdinand de (1974) Course in General Linguistics (Translated from French by Wade Baskin) Fontana/Collins.
Whorf, B.L. (1956) Language, Thought and Reality (Ed J Bcarroll), Cambridge, Mass: MIT Press

(Self Censorship) सेल्फ सेंसरशिप

(Self Censorship) सेल्फ सेंसरशिप एखाद्या व्यक्तीने अथवा संस्थेने स्वत:हून आपल्या विचार आणिअभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्याला सेल्फ सेंसरशिप म्हणतात. अशा प्रकारचे निर्बंध स्वत:वर लागू करणेबरे की राज्य किंवा प्रशासनाकरवी तसे निर्बंध घालणे बरे यावर बरीच मते आहेत. विचार आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे भारताच्या घटनेप्रमाणे जगातील इतर देशातील घटनांमधेसुद्धा मूलभूत हक्क म्हणून मान्य केले आहे. विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर उपभोगायचे असेल आणि अशा स्वातंत्र्यातून लोकशाही चालवायची असेलतर माध्यमे खाजगी मालकीची असणे आवश्यक आहे असा एक मतप्रवाह आहे. मात्र खाजगी मालकीची माध्यमेही नेहमीच लोकहित जपतील काय की व्यावसायिक फायद्यासाठी लोकहिताला घातक अशा गोष्टी करतील? अशा परिस्थितीत माध्यमांच्या विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दुरुपयोगाला निर्बंध कोण घालणार? याप्रश्नांच्या चर्चेतून माध्यमांनी काय छापावे, दाखवावे याबाबत समाजहित, विचार आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या तत्त्वांच्या दृष्टीने आणि लोकशाहीची मूल्ये जपण्याच्या दृष्टीने माध्यमांनी स्वत:वर निर्बंध घालावेअसा विचार जास्त योग्य आहे असे बहुमत आहे.
मात्र स्वत:वर निर्बंध घालत असताना पत्रकारितेच्या काही मूल्यांना जपावे लागते आणि ते कठीण होऊन बसते. पत्रकारितेत वस्तुनिष्ठतेला फार महत्त्व आहे. जर पत्रकारांनी किंवा माध्यम संस्थांनी स्वत:वर निर्बंध घातले तरवस्तुनिष्ठता कशी राखता येईल? कारण कुठली बातमी कशी आणि किती महत्त्व देऊन छापायची हा निर्णय त्यात्या पत्रकाराच्या आणि माध्यम संस्थेच्या अख्त्यारीतला प्रश्न होऊन जातो. बातमी छापलीच नाही तर वाचकांनात्या घटनेबाबत कळणे शक्यच नाही आणि त्यावर विचार करणे, काही मत बनवणेही शक्य नाही.
वाढत्या व्यावसायिकतेमुळे माध्यम संस्था नेहमीच लोकहित जपण्यासाठी स्वत:वर निर्बंध घालत नसतात तरव्यावसायिक नफा किंवा नुकसान पाहून असे निर्णय घेतले जातात. यात माध्यम संस्थांचा जरी फायदा होतअसला तरी लोकहिताचा बळी जाण्याची शक्यता आहे.
युद्धाच्या प्रसंगी पत्रकाराने शत्रू राष्ट्राबाबतच्या सकारात्मक बातम्या द्याव्यात काय? आपल्याच देशाबाबतचेनकारात्मक चित्र तयार होईल अशा बातम्या पत्रकारांनी द्याव्यात काय? देशाची सुरक्षितता, राजकारण आणिअर्थकारणासारख्या विषयांबाबत स्वत:वर निर्बंध घालणे अनेकदा आवश्यक असते मात्र अशाप्रकारच्यानिर्बंधांमुळे विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा पडतात.

(Public Relations) पब्लिक रिलेशन्स

(Public Relations) पब्लिक रिलेशन्स – जनसंपर्क. कुठल्याही संस्थेचा अथवा व्यक्तिचा सार्वजनिक चेहरामांडणे हे जनसंपर्काचे सर्वसाधारणपणे काम असते. संस्थेची तत्त्वे उद्दिष्ट्ये त्या त्या संस्थेशी निगडितलोकांसमोर आणणे त्याबाबतचे विचार लोकांकडून जाणून घेणे हेही अपेक्षित असते. त्याचबरोबर संस्थेचादृष्टिकोन लोकांना पटवून देणे अपेक्षित असते.
भारतात पत्रकारांचा आणि जनसंपर्क व्यावसायिकांचा संबंध फार मजेशीर टप्प्यावर येऊन ठेपला आहे. गेल्या दोनदशकात अनेक ज्येष्ठ पत्रकार जनसंपर्क अधिकारी झाले आहेत तर आता काही जनसंपर्क व्यावसायिक पत्रकारझाले आहेत. वर्तमानपत्रे अधिकाधिक व्यावसायिक होत आहेत. परिणामी प्रत्येक माध्यम संस्थेचे व्यावसायिकहितसंबंध निर्माण झाले आहेत. हे हितसंबंध केवळ आर्थिक किंवा व्यावसायिक संस्थांशी नसून राजकीय आणिसामाजिक संस्थांशीही जोडले गेले आहेत. अशा परिस्थितीत पत्रकारांना एखाद्या संस्थेची किंवा व्यक्तीची माहितीहवी असल्यास ती अधिकृत सूत्रांकडून मिळणे अधिक प्रशस्त असते. मात्र अशी माहिती नेहमीच संपूर्णपणे खरीअसेल असे नाही. याचे कारण जनसंपर्काचे एक काम म्हणजे व्यक्ती किंवा संस्थेची सार्वजनिक प्रतिमा जपणे हेहीआहे.
जनसंपर्काचे एक उद्दिष्ट्य चांगली प्रतिमा बनविणे आणि असलेली प्रतिमा जपणे हे आहे. जनसंपर्क व्यावसायिकअनेकदा माध्यमांचा उपयोग विषय नेपथ्य तयार करण्यासाठी करतात. सतत तीव्र होत जाणार्यां स्पर्धेमुळेजनसंपर्क व्यावसायिक विषय नेपथ्य तयार करण्यात अधिकधिक तरबेज होत आहेत. एरवी ज्या घटनेची बातमीहोणार नाही अशा एखाद्या घटनेचे नेपथ्य बदलून, संदर्भाची चौकट बदलून त्या घटनेची बातमी बनवण्यात आताजनसंपर्क व्यावसायिक पटाईत झाले आहेत. अशावेळी जनसंपर्क व्यावसायिक नेहमीच आपली उद्दिष्ट्ये स्पष्टकरीत नाहीत. त्यामुळे पत्रकार आणि जनसंपर्क व्यावसायिक यांच्यामधील नात्यात कुशंकेला खूप वाव असतो. जनसंपर्क अधिकार्यायकडून मिळालेली बातमी छापण्यात आपला वापर तर करून घेतला जात नाहिए ना असाप्रश्न पत्रकारांना सतत भेडसावत असतो. अनेक व्यावसायिक, राजकीय आणि सामाजिक संस्था व्यक्तीजनसंपर्काचा उपयोग पत्रकारांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी करताना दिसतात.
त्याचबरोबर पत्रकारसुद्धा जनसंपर्क अधिकार्यांयकडून मिळणार्याव माहितीवर अधिकधिक अवलंबून होतानादिसतात. एकतर माहिती अधिकृत असते आणि दुसरे ती कुठल्याही कष्टाशिवाय मिळते.
जनसंपर्काच्या कामाचे मूल्यमापन करणे कठीण आहे. एखाद्या संस्थेची किंवा व्यक्तीची प्रतिमा चांगली झालीआहे याचे परिमाण काय असावेत? उदाहरणार्थ जाहिरात केली तर खप वाढतो असे दाख़वता येईल. मात्रजनसंपर्कामुळे प्रतिमा उजळली असे दाखवण्याजोगे काही नाही. त्यामुळे जनसंपर्क म्हणजे माध्यम संपर्क असासमज भारतात रूढ झाला आहे. यामुळे एखाद्या संस्थेबाबत अथवा व्यक्तीबाबत किती बातम्या कुठल्यावर्तमानपत्रात छापून आल्या यावर जनसंपर्काची परिणामकारकता ठरविली जाते. परदेशात मात्र जनसंपर्क हासंवाद शास्त्रातील एक महत्त्वाचा विषय मानला जातो. अनेकदा तर संस्था जाहिरात विभागापेक्षा जनसंपर्कविभागावर जास्त पैसे खर्च करतात.

(Convergence) कंव्हर्जंस - एककेंद्राभिमुखता

(Convergence) कंव्हर्जंस - एककेंद्राभिमुखता. संगणक, रेडिओ, टी व्ही, वर्तमानपत्रे आणि माहितीतंत्रज्ञानाची विविध उपकरणे, उदाहरणार्थ मोबाईल फोन इत्यादी यांमधील तांत्रिक आणि उपयोगितेच्या दृष्टीनेअंतर हळू हळू कमी होत चालले आहे. यामुळे या विविध उपकरणांमध्ये एककेंद्राभिमुखता आली आहे. याचापत्रकारितेवर परिणाम झाला आहे. आता पत्रकारांना अनेक तांत्रिक कौशल्ये आत्मसात करावी लागतात. त्याचबरोबर पत्रकारिता 'जागतिक' झाली आहे. माहिती महाजालामुळे पत्रकारितेची तत्त्वे आणि मूल्ये ज्यालामहिती आहेत असा कोणीही आज पत्रकारिता करू शकतो. इतकेच नव्हे तर प्रेक्षकही या प्रक्रियेत कधी नव्हेइतक्या प्रमाणात सर्व पातळींवर सहभागी होऊ शकतात. हे सगळे तंत्रज्ञानाच्या एककेंद्राभिमुखतेमुळे शक्य झालेआहे.
तंत्रज्ञानाच्या एककेंद्राभिमुखतेमुळे माध्यमांसंबंधी कायदेही बदलण्याची आवश्यकता आता जाणवत आहे. आजआपल्याकडील वर्तमानपत्रे इत्यादी छापील पत्रकारितेसाठी प्रेस काउंसिल कायदा आहे तर टी.व्ही आणिरेडिओसाठी प्रसार भारती कायदा आहे. मात्र या दोन्ही माध्यमांची एककेंद्राभिमुखता जेथे होते त्या मोबाइलफोनवरील पत्रकारितेबाबत किंवा महाजालाबाबत कायदे सक्षम नाहीत. अनेक माध्यम संस्था आणि पत्रकार आजविविध माध्यमप्रकारांवर काम करत असतात. त्यांच्या कामाचे स्वरूप आणि त्या कामातून उत्पन्न होणार्यामाहितीवर कुठलेच नियंत्रण शक्य होत नाही.
एककेंद्राभिमुखतेमुळे माध्यमे माध्यमरूपांतर (mediamorphosis) ही प्रक्रियाही होते आहे.
ज्याप्रमाणे तंत्रज्ञानाच्या बाबतीत एककेंद्राभिमुखता होते आहे त्याचप्रमाणे सांस्कृतिक, सामाजिक, अर्थशास्त्रीयआणि जागतिक एककेंद्राभिमुखता होते आहे.

अधिक माहितीसाठी वाचा:
Jenkins, Henry (2006). Convergence Culture: Where Old and New Media Collide. New York: New York University Press.
Jenkins, Henry (2003). Rethinking Media Change: The Aesthetics of Transition. Media in transition. Cambridge. Mass.: MIT Press

By- Sanjay Ranade,
Dept of Communication and Journalism,
University Of Mumbai.

(Censorship) सेंसरशिप

(Censorship) सेंसरशिपसेंसर म्हणजे मुद्रण नियंत्रक. अशा नियंत्रण करण्याला सेंसरशिप म्हणतात. यानियंत्रण प्रक्रियेचे काही घटक आहेत. एक म्हणजे असे नियंत्रण केवळ मुद्रण क्षेत्राशी सबंधित नसून माहिती आणितंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वच्या सर्व माध्यमांशी सबंधित आहे. दुसरे म्हणजे माहिती मिळवण्यावर आणि तिच्याप्रसारणावर नियंत्रण करता येऊ शकते. तिसरे म्हणजे असे नियंत्रण केवळ सरकारी पातळींवर आणि सरकारीसंस्थांकडूनच होते असे नाही तर समाजाच्या विविध स्तरावर असे नियंत्रण केले जाते. शेवटचे म्हणजे असेनियंत्रण सरकारी पातळीवर होतेच, मग ते सरकार कुठल्या तत्त्वांचा, मतांचा, विचारांचा अवलंबन करत आहेयामुळे फरक पडत नाही.
भारतामध्ये अशा नियंत्रणाला ब्रिटिश काळातच सुरुवात झाली होती. 2 सप्टेंबर 1780 रोजी जेम्स ऑगस्टस हिकीयाच्या बंगाल गझेट या वर्तमानपत्राच्या वितरणावर ब्रिटिशांनी बंदी आणली होती. 1823 साली जेम्स सिल्कबकिंघमच्या कलकत्ता गझेट वर आणलेली बंदी सर्वाधिक गाजली कारण बकिंघमने या बंदी विरूद्ध इंग्लिशकोर्टात दाद मागितली आणि 1834 साली त्याला वर्षाला पाचशे पाउंड इतकी रक्कम भरपाई म्हणून देण्यात आली. 13 मे 1799 साली लॉर्ड वेलेस्ली याने भारतात वर्तमानपत्रांवर नियंत्रण लागू केले. याअगोदर प्रत्येकवर्तमानपत्राला मजकूर छापण्याअगोदर सरकारला दाख़वणे बंधनकारक होते. वेलेस्लीने प्रत्येक वर्तमानपत्रावरसंपादक, मुद्रक आणि मालक यांची नावे प्रसिद्ध करणे बंधनकारक केले.
यानंतर अनेक कायद्यांद्वारे माहितीवर आणि पर्यायाने वर्तमानपत्रांवर नियंत्रण करणे सुरूच होते. याप्रक्रियेतूनच प्रेस काउंसिल ऑफ इंडियाचा जन्म झाला. वर्तमानपत्रांनी स्वत: स्वत:वर नियंत्रण ठेवावे असा यामागचा हेतू होता.
राजकीय अर्थकारणाचा सिद्धांत मांडणार्यां अभ्यासक़ांनी म्हटले आहे की खाजगी संस्थांनी गेल्या दोन दशकातमाध्यम संस्थांवर आपली मक्तेदारी सिद्ध केली आहे आणि जाहिरातदारांना हाताशी धरून त्यांनी आता एकप्रकारेसंमतीचे उत्पादन आरंभिले आहे. पत्रकार स्वत:वर नियंत्रण लादतात आणि यातून या ख़ाजगी माध्यमसंस्थांना असेसंमतीचे उत्पादनकरता येते असे या अभ्यासकांचे मत आहे. यासाठी आता सरकारी नियंत्रणाचीआवश्यकता उरलेली नाही.

अधिक माहितीसाठी वाचा:
Durga Das Basu, Law of the Press, 2002, Wadhwa Nagpur.
Parthasarthy Rangaswami, Journalism in India, From the earliest times to the present day, Sterling Publishers Private Limited, 1989.
Herman and Noam Chomsky, Manufacturing Consent

By Sanjay Ranade,
Dept of Communication and Journalism,
University Of Mumbai.

Broadcasting) ब्रॉडकास्टिंग – प्रक्षेपित करणे:

(Broadcasting) ब्रॉडकास्टिंग – प्रक्षेपित करणे: पेरणीच्यावेळी शेतकरी शेतावरती बिया फेकतो. त्याप्रक्रियेला इंग्रजीत ब्रॉडकास्टिंग असे म्हणतात. या प्रक्रियेची काही वैशिष्ट्ये माध्यम प्रसारणात सारखी आहेत. उदाहरणार्थ बिया फेकल्या तर त्या कुठे पडतील, रुजतील किंवा नाही याचा केवळ अंदाज बांधता येतो. त्याबद्दलनिश्चितपणे काही सांगता येत नाही. माध्यम प्रसारणाचे असेच असते.
आकाशवाणी किंवा दूरदर्शनवरून माहिती प्रक्षेपित होते म्हणजेच ब्रॉडकास्ट होते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातीलशोधाने माहितीच्या प्रसारण आणि प्रक्षेपणात आमूलाग्र बदल घडवून आणला. मार्शल मॅक्लुहानने माध्यमांमुळेज्ञानेंद्रियांचा विस्तार होतो असा जो सिद्धांत मांडला तो प्रक्षेपण आणि विशेषत: दूरदर्शनमुळे थोडा बदलावा लागला. याचे कारण टी.व्ही हे उपकरण एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांचा विस्तार करते.
प्रक्षेपणामुळे जे माध्यम खाजगी होते ते सार्वजनिक झाले. माध्यमांना नवे सामाजिक परिमाण लाभले. अनुभवाच्या कक्षा वाढल्या बदलल्या. एवढेच नव्हे तर ज्ञानाच्या परिभाषाही बदलल्या. उदाहरणार्थ डॉल्फिन हाजीव प्रत्यक्ष पाहिला नसला तरी त्याबद्दलचे ज्ञान आता आत्मसात करणे सहज शक्य आहे. एखाद्याभूप्रदेशाबद्दलचे ज्ञान, एखाद्या समाजाबाबतचे ज्ञानही आता प्राप्त करता येऊ शकते. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभवाचीआवश्यकता नाही. चंद्र, ग्रह, तारे यांच्या बद्दलचे ज्ञान मिळवणे आता सहज शक्य आहे. संगीताच्याबाबतीत तरप्रक्षेपण तंत्रज्ञानाने आमूलाग्र बदल घडवला आहे. आता प्रत्यक्ष संगीत कार्यक्रमाला हजर राहण्याची आवश्यकतानाही. तो अनुभव बसल्या ठिकाणी घेणे आता शक्य आहे.

अधिक माहितीसाठी वाचा:
Ivo Josipovi, The Mass Media and Musical Culture, International Review of the Aesthetics and Sociology of Music, Vol. 15, No. 1. (Jun., 1984), pp. 39-51.

By - Sanjay Ranade
Dept of communication and Journalism
University of Mumbai.

(Bias) बायस – प्रवृती:

(Bias) बायस – प्रवृती: प्रवृती माध्यमांची, पत्रकारांची, प्रेक्षकांची, जाहिरातदारांची आणि माध्यमांमध्ये अनेकअर्थाने गुंतवणूक करणार्या सर्व प्रकारच्या लोकांची असते. काही माध्यमे कालातीत असतात. उदाहरणार्थ दगड. अशा माध्यमांचा वापर केल्यास माहितीही कालातीत होते. मात्र माहितीचे प्रसरण मर्यादित होते. काही माध्यमांनास्थलाच्या मर्यादा कमी असतात. उदाहरणार्थ कागद. कागदावरील माहिती अधिक व्यापक क्षेत्रावर प्रसरण पावूशकते. मात्र कागदाचा काळ दगडापेक्षा कमी असतो. साम्राज्यांचा काळ आणि क्षेत्र हे त्या साम्राज्यात वापरातयेणार्याा माध्यमांवर आणि त्यांच्या प्रवृतींवर अवलंबून असतो असा सिद्धांत हॅरॉल्ड इनिस या कॅनेडातीलअभ्यासकाने सर्वप्रथम मांडला. माध्यमांच्या प्रवृत्ती असतात त्या ओळखणे गरजेचे असते यावरून मार्शलमॅक्लुहान याने माध्यमे ही माणसाच्या ज्ञानेंद्रियांचा विस्तार करतात असा सिद्धांत पुढे मांडला. उदाहरणार्थ रेडिओहा माणसाच्या श्रवणेंद्रियाचा तर वर्तमानपत्रे आणि कॅमेरा डोळ्याचा विस्तार करतात.
माध्यमांच्या प्रवृत्तींमुळे संदेशवहनाला मर्यादा पडतात आणि काहीवेळा केवळ माध्यम प्रवृतीमुळे संदेश पोहोचतनाही अथवा त्यातून वेगळाच अर्थ पोहोचतो. त्यामुळे संदेशाबरोबर तो कुठल्या माध्यमाद्वारे पोहोचवला जातोआहे याला देखील महत्त्व प्राप्त होते. एखादा संदेश जर लोकांच्या पचनी पडणारा नसेल तरी योग्य माध्यमवापरले तर लोकांपर्यंत पोहोचवता येतो. म्हणजेच संदेशापेक्षा कधी कधी माध्यम आणि त्याच्या प्रवृतींमुळे संदेशजास्त परिणामकारक होतो. य़ावरूनच माध्यम म्हणजे एकप्रकारची संदेशाची मालिश (medium is the massage) किंवा माध्यम म्हणजेच संदेश (medium is the message) असा सिद्धांत मॅक्लुहानने मांडला.
प्रेक्षकांच्याही प्रवृत्ती असतात आणि पत्रकारांच्याही. वस्तुनिष्ठता ही जरी पत्रकाराला बंधनकारक असली तरी तीनेहमीच शक्य नसते याचे कारण म्हणजे माणसातील प्रवृत्ती. अशा प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट करणे शक्य नसते. म्हणून न्याय्य असणे, समतोल राखणे, सर्व बाजू पैलू मांडणे इत्यादींचा आग्रह धरला जातो. माहितीच्यासार्वत्रिकरणाचा जसा प्रेक्षकांवर परिणाम होतो तसाच तो पत्रकारांवरही होतो. माहिती सहज उपलब्ध होते, अनेकमार्गांनी उपलब्ध होते यामुळे कुठली बातमी महत्त्वाची आहे याचे आकलन कठीण होऊन जाते. मग व्यक्तिगतप्रवृत्तींचा प्रभाव वाढतो. हा प्रभाव नकळत, सूप्त असू शकतो.
प्रेक्षकांच्या प्रवृतींचा माध्यमांवर प्रभाव असतो. प्रेक्षक जर स्वत:च्या वास्तवाबाबत आणि त्यातून निर्माणहोणार्याा त्यांच्या प्रवृत्तींबाबत चिकित्सक असतील तर पत्रकारितेचे स्वरूप तसे होते मात्र जर प्रेक्षक आग्रहीआणि असहिष्णु असतील तर पत्रकारितेचे स्वरूपही तसेच होते.

Translated By - Sanjay Ranade
Dept Of Communication and Journalism,
University of Mumbai

अधिक माहितीसाठी वाचा:
Glasgow Media Group (1976) Bad News, London: Routledge and Kegan Paul.

(Audience) ऑडियंस – प्रेक्षक:

(Audience) ऑडियंस – प्रेक्षक: वर्तमानपत्रांचे वाचक, आकाशवाणीचे श्रोते आणि दूरदर्शन आणि इंटर्नेटचे श्रोते-प्रेक्षक या सगळ्यांना ‘प्रेक्षक’ ही संज्ञा लागू होते. अनेक अभ्यासकांनी पत्रकार आणि प्रेक्षक यांच्यातील नात्याचा अभ्यास केला आहे. गांस (1980), श्लेसिंजर (1987), हॅरिसन (2000), लांस बेनेट, मिंडिच इत्यादींच्या अभ्यासावरून असे लक्षात येते की पत्रकार आणि प्रेक्षक आणि माध्यम संस्था आणि प्रेक्षक यांचे नाते वेगवेगळे असते. त्याचबरोबर माध्यमे आणि प्रेक्षक एकमेकांवर परिणाम करतात. पत्रकार हे प्रेक्षकांकडे संख्यात्मक दृष्टिने पाहत नाहीत तर गुणात्मक दृष्टिने पाहतात. त्यामुळे प्रेक्षक कुठल्या विचारसरणीचे आहेत, त्यांची भावात्मक, राजकीय, सामाजिक व नैतिक घडण कशी आहे इत्यादींचा विचार पत्रकार जास्त करतात. याउलट माध्यम संस्था हे प्रेक्षकांकडे संख्यात्मक दृष्टीने पाह्तात. यामुळे कधीकधी माध्यम संस्था आणि पत्रकार यांच्यात संघर्ष निर्माण होतो. उदाहरणार्थ संपादकीय धोरणामुळे जर पाच टक्के प्रेक्षकांनी वर्तमानपत्र बदलले किंवा दूरचित्रवाणीची वाहिनी बदलली तर माध्यम संस्थेतील व्यवस्थापन संपादकीय विभागाला आपले धोरण बदलण्याचा आग्रह धरु शकते. त्याउलट संपादकीय विभाग असे म्हणेल की ज्याअर्थी पंच्याण्णव टक्के लोकांनी तेच वृत्तपत्र किंवा वाहिनी कायम ठेवले आहेत त्याअर्थी लोकांना बदलले संपादकीय धोरण मान्य आहे व तेच कायम ठेवावे.

वाचकांची पत्रे, एसएमएस, ईमेल इत्यादींद्वारे पत्रकार व माध्यमे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव आणि विचारांची दिशा पडताळून पाहत असतात. प्रेक्षकही आपली मते माध्यमांपर्यंत पोहोचवत असतात. जे लोकहिताचे असते ते नेहमीच सर्व लोकांच्या पचनी पडणारे नसते आणि लोकांना जे आवडते ते नेहमीच हिताचे नसते. यामुळे लोकहित जपावे की लोकांची आवडनिवड पुरवावी असा प्रश्न पत्रकार आणि माध्यम संस्थांना सतावत असतो व त्यांच्यामधील संघर्षाचे कारणही होतो.

या संघर्षातूनच दोन प्रक्रिया सुरू होतात. एक आहे audience fragmentation किंवा प्रेक्षकांचे अंशीकरण आणि दुसरी आहे audience segmentation किंवा प्रेक्षकांचे विभाजन. प्रेक्षकांपुढील माध्यमांचे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे प्रेक्षक कुठल्याही एका माध्यमाचे किंवा माध्यम उत्पादनाचे अंशत:च ग्राहक होतात. अशामुळे जाहिरातदाराला केवळ वाचक संख्या किंवा प्रेक्षक-श्रोत्यांची संख्या यावरून आपली जाहिरात किती जणांपर्यंत पोहोचली हे सांगता येत नाही. यावर उपाय म्हणून जाहिरातदार विविध माध्यमांतून आणि माध्यम उत्पादनांतून आपल्या जाहिरातीचा मारा करतात.

त्याचबरोबर असेही आढळले आहे की प्रेक्षक हे सुप्त ग्राहक नव्हेत. ग्राहकांच्या सामाजिक, राजकीय, पारिवारिक, आर्थिक परिस्थितीचा परिणाम ते जे माध्यम आणि माध्यम उत्पादन निवडतात यावर पडतो व त्यानुसार प्रेक्षकांचे विविध सामाजिक, राजकीय, आर्थिक इत्यादी गटात विभाजन शक्य होते. असे विभाजन केल्यास कुठल्या वस्तूच्या जाहिराती कुठे जास्त प्रमाणात द्याव्यात हा निर्णय घेणे सोपे जाते.

आज प्रेक्षकांचे अंशीकरण आणि विभाजन करणे हे शिस्तबद्ध पद्धतीने विपणन शास्त्र आणि व्यवस्थापन शास्त्रात शिकवले जाते.


Translated By- Sanjay Ranade,

Dept of Communication and Journalism,

University of Mumbai.

अधिक माहितीसाठी वाचावे:

Allan, S. (1999) News Culture Buckingham: Open University Press.

Gans, H J (1980) Deciding What’s News. London: Constable

Harrison, J (2000) Terrestrial TV News in Britain: The Culture of Production, Manchester, Manchester University Press.

Schlesinger, P (1987) Putting Reality Together, London: Metheun

W Lance Bennett (2006), News: The Politics of Illusion, Longman.

David Mindich (2005), Tuned Out: Why Americans Under 40 Don't Follow the News, OUP.